Wednesday 21 March 2012

No Expectations No Demands
रणबीर आणि कतरिनाच्या एका गाजलेल्या चित्रपटात त्याचा एक dialogue होता.साधारण 'मी No Expectations No Demandsअशी मैत्री निभावेन या अर्थाचा.' घाबरू नका, मी त्या चित्रपटाबद्दल किंवा त्यांच्या अभिनयाबद्दल काही समीक्षण वगैरे लिहित नाहीये.या   dialogue वर असा विचार आला ,खरंच अशी अपेक्षा न करणार,गृहीत न धरणारी मैत्री शक्य असते?
पटकन कोणीही हो..... म्हणू शकणार नाही.कारण 'मित्र असतातच त्रास द्यायला' हे जगन्मान्य सत्य आहे.मित्र मैत्रिणीन शिवाय एकत्र दंगा कोण करणार?अडीअडचणीला  धावून कोन येणार?'माझी assignment तू लिही' अस हक्काने कोणाला सांगणार,वेळेवर न आल्याबद्दल आपण आधी झापायच आणि पुढच्या वेळी आपणच उशिरा जायचं हे कस करणार?कडकीमध्ये उधार कोण देणार?अशी लांबलचक यादी पटापट डोळ्यासमोर येते. 
काही वेळा आपण लहान गोष्टींसाठी मित्र मैत्रिणींकडून अपेक्षा करतो(ट्रीप वरून यातना आपल्यासाठी नक्की काहीतरी आणतील ),त्यात मजाही असते.पण एखाद्या वेळी त्यांना गृहीत धरल जात आणि त्याचा सर्वांनाच त्रास होतो.आपल्या शिवाय त्यांच्या priority list वर दुसराही कुणी असू शकेल ... एखाद काम,एखादी व्यक्ती,काहीही तर ते लागत मनाला.मग अशी मैत्री शक्यच नसते?की आपण उस गोड लागला म्हणून ....या न्यायाने वागतो जवळच्या लोकांशी.....असा काहीसा विचार चालू होता.इतक्यात कॉलेजमधल्या एका junior मैत्रिणीचा फोन आला.तिला एका लेखासंबंधी काही suggestions हवे होते.त्या बद्दल बोलल्यानंतर आम्ही नेहमीप्रमाणे होस्टेल ला यथेच्छ नावं ठेवली,आणि होस्टेल मधल्या मैत्री आणि unity चा उदो उदो केला,गप्पा मारल्या आणि फोने बंद केला.नंतर लक्षात आल,काही अशी नाती अजूनही आहेत आपल्या जवळ जी सतत संपर्कात नसतात.त्यांच Expectations ,Demands या शब्दांशी त्यांच काहीही नात नसत.ट्रेनच्या प्रवासात भेटलेली एखादी मैत्रीण,कॉलेजमधले Senior आणि Junior वर्गातले अनेक जण,जुन्या तात्पुरत्या म्हणून झालेल्या आणि नंतर बराच काळ टिकलेल्या ओळखी.... यांच्याशी आपण नियमित संपर्कात नसतो.कधी क्वचित मेसेज किंवा facebook वर भेट होत.आपण सहज एखादा विचार शेअर करतो,एखादा सल्ला/माहिती विचारतो....पण ती फार महत्वाची ठरते!कुणी एखादी आठवण सांगत,कुणी अचानक फोन करून,'अमक्या event च नावं सुचाव 'म्हणत..... असे फोन झाल्यावर आपणही खुश असतो की इतक्या दिवसांनी या व्यक्तीने माझी आठवण काढली.... अपेक्षा नसताना कुणी आपली आठवण काढतंय म्हटल्यावर अर्थातच आनंद जास्त होतो.आणि या आनंदात आपणही एखाद्या No Expectations No Demands गटातल्या एखाद्या मित्राला फोन लावतो.अस असाल तरीही आपण जवळच्या मित्र मैत्रिणींशी तटस्थपणाने किंवा संतपणाची भूमिका घेऊन नाही वागू शकत.त्यांच्या सोबत दिलखुलास हसण्या सोबतच त्यांच्यावर चिडण,ओरडण हे सुद्धा स्वाभाविकपणे होतच.मग यांचा समतोल कसा साधायचा?
जवळ असणाऱ्यांवर मोजका हक्क गाजवू आणि इतरांनी दूर जाऊ नये म्हणून असे संपर्कात राहू :)


5 comments:

  1. Like!!! are baba content jar changla asel tar me neat design ani present karun deyil!!!

    ReplyDelete
  2. sunder... as usual u r perfect to the point and lively.... pan mala last kahi sentences nahi kalali... will discuss on that....

    ReplyDelete
  3. Thnks.its abt close frnds.wil surely discus.

    ReplyDelete
  4. in school days, maths madhye ek funda hota "proving with help of ábsurd methid'"
    u have to consider something, u prove ur consideration is wronge...
    in case of movie..same might be the thing..

    about concept, yes..very well pointed..
    lai jorat discussion karu..

    ReplyDelete